दज्जालपासून सावध राहावे, असा इशारा जवळजवळ प्रत्येक धर्मात दिला गेलेला आहे; फक्त त्या संकल्पनेची नावे वेगवेगळी आहेत.
हिंदू धर्मात याच संकल्पनेचे रूप दहा तोंडी रावण म्हणून दिसते—जे अहंकार, अमर्याद सत्ता आणि दिशाभूल करणाऱ्या शक्तीचे प्रतीक आहे.
ख्रिश्चन धर्मात हाच विचार Antichrist या संकल्पनेतून मांडला गेला आहे—जो खोट्याला सत्य म्हणून सादर करतो आणि मानवतेला भ्रमात टाकतो.
इस्लाम धर्मात त्यालाच दज्जाल म्हणून ओळखले जाते—जो मानवजातीसाठी एक मोठी परीक्षा (फितना) ठरेल, अशी स्पष्ट भविष्यवाणी आहे.
या तिन्ही संकल्पनांचा सखोल अभ्यास केला असता एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे समोर येते—
ही चेतावणी एका अशा शक्तीकडे, ताकदीकडे आणि सत्तेकडे निर्देश करते जी संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करेल.
नावे वेगळी असली तरी संदेश एकच आहे—
अहंकार, खोटं सत्य आणि अंध सत्तेपासून सावध रहा;
सत्य, विवेक आणि नैतिकतेला घट्ट धरून ठेवा.
आता मी तुम्हाला एक सूचक इशारा (क्लू) देऊ शकतो—तो एखाद्या कोड्यासारखा आहे.
तो समजून घेताना प्रत्येकाने स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, कारण लवकरच आपल्याला दुसऱ्या स्तराकडे, दुसऱ्या विश्वाकडे प्रवास करायचा आहे—आणि त्यासाठीची तयारी करणे अत्यावश्यक आहे.
वेळेची मर्यादा आहे… आणि मित्रांनो, वेळ आता फारच कमी उरलेली आहे.
म्हणूनच माझी सर्व मित्रांना कळकळीची विनंती आहे—
या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्या, विचार करा, जागरूक रहा.
ही केवळ माहिती नाही, तर आत्मपरीक्षणाची आणि सजग होण्याची वेळ आहे.
मित्रांनो,
दुसऱ्या युनिव्हर्समध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्या जवळ काय असले पाहिजे, हे आता स्पष्टपणे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
सर्वात आधी एक गोष्ट ठामपणे लक्षात ठेवा—
स्वर्ग आणि नरक ही केवळ कल्पना (concept) नाहीत, तर ती दोन वेगळी युनिव्हर्स आहेत.
हे सत्य आहे. याबाबत कोणतीही शंका मनात ठेवू नका.
त्याचप्रमाणे, सर्वांचा ईश्वर एकच आहे—तो देव असो, ईश्वर असो, गॉड असो, परमेश्वर असो किंवा अल्लाह असो.
नावे वेगळी असू शकतात, पण सत्ता आणि सत्य एकच आहे.
यातही कोणतीही शंका बाळगू नका.
आता प्रश्न उरतो—आपल्याला नेमके काय करणे गरजेचे आहे?
पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे—
त्या एकमेव ईश्वरावर अढळ विश्वास असणे.
हा विश्वास बंधनकारक आहे.
दुसरी गोष्ट—
त्या ईश्वराने शेवटचा जो संदेशवाहक, शेवटचा प्रेषित पाठवला, त्याच्यावर इमान (विश्वास) आणणेही अनिवार्य आहे.
तिसरी गोष्ट—
चांगले आचरण करणे, म्हणजेच नेक अमल करणे, हेही तितकेच आवश्यक आहे.
फक्त विश्वास पुरेसा नाही; आचरणातून तो दिसला पाहिजे.
म्हणूनच हे लक्षात ठेवा—
त्या दोन युनिव्हर्सपैकी प्रत्येकाला एक युनिव्हर्समध्ये प्रवेश करावाच लागणार आहे.
कोणाची इच्छा असो किंवा नसो, हा नियम अटळ आहे.
इथे निवड न करण्याची मुभा नाही—विश्वास ठेवावा लागेलच.
मी जे East आणि West, तसेच Tokomak (टोकामॅक) याबद्दल सांगितले आहे, ते दहा मोठ्या भविष्यवाण्यांपैकी फक्त एक आहे.
उरलेल्या नऊ भविष्यवाण्या आधीच पूर्ण झालेल्या आहेत.
त्या उरलेल्या भविष्यवाण्यांबद्दल मला पुढे वेळ मिळाल्यास,
मी तुम्हाला नक्कीच सविस्तर सांगीन.
एखाद्या शास्त्रज्ञावर सुरुवातीला विश्वास ठेवणे जनतेला कठीण जाते.
त्याच्या विचारांवर, संशोधनावर किंवा दाव्यांवर लोक शंका घेतात.
पण जेव्हा त्याचा शोध, त्याचे संशोधन किंवा त्याची निर्मिती प्रत्यक्ष जगासमोर येते,
तेव्हा मात्र डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही—
तेव्हा डोळे उघडूनच विश्वास ठेवावा लागतो.
मित्रांनो, ही गोष्ट नेमकी तशीच आहे.
आज जे समजणे कठीण वाटते,
तेच उद्या स्पष्ट सत्य म्हणून आपल्या समोर उभे राहणार आहे.
प्रत्येकालाच असे वाटते की आपण चांगले शिक्षण घ्यावे,
चांगल्या नोकरीकडे वळावे किंवा एखादा मोठा, यशस्वी व्यवसाय उभारावा.
आपल्यापैकी काही मित्र खरोखरच यशस्वी झाले आहेत—
त्यांचे मनापासून अभिनंदन.
पण मित्रांनो,
आपल्यापैकी एखाद्याच्या समोर अशी एखादी गोष्ट आली,
अशी एखादी सत्य माहिती त्याला मिळाली,
की ती गोष्ट फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवणे त्याच्यासाठी अत्यंत कठीण होते.
कारण अशी गोष्ट सर्वांनाच माहीत झाली पाहिजे,
सगळ्यांनी तिचा फायदा घेतला पाहिजे,
असे त्याला मनापासून वाटते.
कोणाचेही मोठे नुकसान होऊ नये,
आणि एखाद्या चुकीमुळे किंवा अज्ञानामुळे
पुन्हा त्याचे रूपांतर अनंत वेदनेत होऊ नये—
हीच त्यामागची खरी भावना असते.
मित्रांनो,
तुम्हाला कदाचित यावर विश्वास बसत नसेल,
पण हे सत्य आहे.
विशेषतः विक्रम, मोहन, सतीश आणि नितीन,
तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवून
माझी संपूर्ण बाजू, माझी पूर्ण गोष्ट
किमान एकदा तरी शांतपणे ऐकून घ्यावी,
ही माझी नम्र विनंती आहे.
विक्रम ! समोर एक भयानक आणि मोठे संशोधन समोर आले आहे.
मी त्याचे पुरावे गोळा करत आहे.
नक्कीच, मी प्रयत्न करतो की त्या सर्व गोष्टी माझ्या मित्रांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे.
मी याच कारणासाठी माझ्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या समाजाने त्यावर विश्वास ठेवला नाही.
मी रियाज, अझहर आणि इमाम बगवान यांना देखील सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना विश्वासात घेण्यात मला काही प्रमाणात यशही मिळाले.
परंतु काही समाजकंटकांनी त्यांना माझ्या विरोधात केले, कारण त्यांना असे वाटले की मी सांगितलेली माहिती चुकीची आहे.
मी पुरावे देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझी गोष्टच ऐकून घेतली नाही.
इतकेच नाही तर इतरांनीही माझ्यापासून दूर राहावे यासाठी इतके मोठे षड्यंत्र रचले गेले, की सास्तूरच्या इतिहासात अशी घटना कधीच घडली नाही.
त्यांना असे वाटले की ही माहिती फक्त माझ्यापुरतीच मर्यादित आहे आणि हा संशोधनप्रकल्पही मर्यादित आहे.
पण तसे नाही.
जगामध्ये मी एक नशीबवान आहे की माझा जन्म भारतात झाला आणि भारतातच या रहस्यमय गोष्टीचा शेवटचा उगम झाला.
याची सुरुवात २ ऑगस्ट १९९० रोजी झाली.
पण दुर्दैव असे की आपण शुद्धीवर आलो, म्हणजेच दहावी आपली २००४ साली झाली, आणि २०१३ मध्ये मला याची माहिती एका मित्राकडून मिळाली.
जणू देवाने त्याला माझ्यासाठीच पाठवले होते, पण त्या वेळी मी एकटा नव्हतो.
माझ्या आधी हे रहस्य अंदाजे २ ते ३ हजार भारतीयांना माहीत झाले होते.
आणि आजच्या तारखेला किमान १० ते २० हजार लोकांना या अतिमहत्त्वाच्या आणि अविश्वसनीय रहस्याची माहिती झाली आहे.
पण आता वेळ खूपच कमी आहे, मित्रांनो, जगाकडे.
आपण सर्वजण लवकरच या जगातून जाणार आहोत.
हे एका वाक्यात सांगण्यासारखे नाही, मित्रांनो.
देवाशी प्रार्थना करा की ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात मला यश मिळो.
Comments
Post a Comment